प्रस्तावना
महाराष्ट्रात शेती ही पावसावर अवलंबून असते. परंतु अनियमित पाऊस, दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana – PMKSY) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ‘हर खेत को पानी’ आणि ‘More crop per drop’ या घोषवाक्यांनुसार प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे.

योजनेचे उद्दिष्ट
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana – PMKSY) ही योजना सरकारने चालू करताना च नेक विचार डोक्यात ठेऊनचं ही योजना सुरू करण्यात आली याची काही उद्दीष्ट ठेवली गेली होती, जी खालील प्रमाणे आपल्याला पाहता येतील.
– प्रत्येक शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे.
– पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमी पाण्यात जास्त पीक घेणे.
– जलसंधारण, मृदा संरक्षण आणि पाणी बचतीला चालना देणे.
– ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकलर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहन देणे.
योजनेअंतर्गत घटक
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana – PMKSY) योजनेतून लाभार्थी वगळले जाऊ नयेत यासाठी व लाभार्थी गरज लक्षात घेऊन ही योजना तयार केली गेली आहे.
1. पर ड्रॉप मोर क्रॉप (Per Drop More Crop) – ड्रिप इरिगेशन व स्प्रिंकलर यंत्रासाठी अनुदान.
2. हर खेत को पानी (Har Khet Ko Pani) – सिंचनाविना असलेल्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवणे.
3. जलसंधारण व जलसंवर्धन – बंधारे, शेततळी, नाले खोल करणे, मृदा धूप थांबवणे.
लाभ / फायदे
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana – PMKSY) या योजनेचा सर्वाधिक शेतकरीना लाभ घेता यावा यासाठी त्याची योजना काय आहे समजताना त्या योजनेचे फायदे काय आहेत हे समाजाने गरजेचे आहे.
– ड्रिप व स्प्रिंकलर सिस्टीमसाठी ४५% ते ५५% पर्यंत अनुदान.
– पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
– पाणी, वीज व मजुरीची बचत होते.
– शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.
पात्रता
– महाराष्ट्रातील सर्व शेतकरी (लहान, सीमांत व मोठे).
– अर्जदाराच्या नावावर शेती असणे आवश्यक.
– अर्जदाराकडे आधार कार्ड, बँक खाते आणि सातबारा उतारा असणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
कोणतीही योजना राबवताना त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र ची पूर्तता करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana – PMKSY) या योजने साठी सुद्धा कागदपत्र खालील प्रमाणे दिली आहेत.
– आधार कार्ड
– सातबारा उतारा
– बँक पासबुकची प्रत
– पासपोर्ट फोटो
अर्ज कसा करावा?
1. अधिकृत महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in/) वर लॉगिन करावे.
2. ‘कृषी विभाग’ या विभागात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निवडावी.
3. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
4. अर्जाची तपासणी झाल्यानंतर मंजूरी मिळते.
5. कृषी विभागाच्या अधिकृत कंपनीमार्फत ड्रिप / स्प्रिंकलर बसवून दिला जातो.
संपर्क साधा
– ग्रामसेवक / तलाठी / कृषी सहाय्यक
– तालुका कृषी अधिकारी कार्यालय
– महाडीबीटी पोर्टल

निष्कर्ष
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. आधुनिक सिंचन तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात जास्त पीक घेणे शक्य होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली शेती उत्पादनक्षम करावी.









1 thought on “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) महाराष्ट्र २०२5 – सविस्तर माहिती”